Guru Purnima Mahiti in Marathi [गुरुपौर्णिमा माहिती]
आषाढी पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या ‘व्यासपौर्णिमेला’ गुरुपौर्णिमा देखील म्हणतात. वेदव्यासजींनी ऋषींचे विखुरलेले अनुभव समाजासाठी उपयोगी बनवून व्यवस्थित करून घेतले. या पौर्णिमेच्या दिवशी पंचम वेद ‘महाभारत’ ची रचना पूर्ण झाली आणि जगातील प्रसिद्ध आर्ष ग्रंथ ब्रह्मसूत्र लिहिण्यास या दिवशी प्रारंभ झाला. मग देवतांनी वेदव्यासजीची पूजा केली. तेव्हापासून व्यासपौर्णिमा साजरी होत आहे. या दिवशी ब्रह्मवेता सद्गुरूंच्या चरणी पोहोचणारे आणि संयम-श्रद्धा-भक्तीने त्याची उपासना करणारे शिष्य वर्षभर उत्सव साजरा करण्याचे फळ प्राप्त करतात. आणि तुम्ही पौर्णिमा साजरी करता पण गुरुपुनम तुम्हाला साजरी करते, भाऊ! जगात खूप भटकलात, खूप अडकलात आणि खूप लटकून राहिलात. जेथे जेथे गेलात तेथे स्वत:ची फसवणूक व त्रास करून घेतलात. आता आपल्या आत्म्यात विश्रांती घ्या. गुरु शिखर! गवत अगदी थोड्याश्या वाऱ्यामुळे हलते, पाने देखील उडतात परंतु डोंगर सरकत नाही. त्याचप्रमाणे, गुरुपौर्णिमा अशा स्वामींचे सानिध्य देते, ज्यांचे मन संसारातील तू-मी, निंदा-स्तुती, आनंद-दु: ख, फसवणूक, कपट, चर्चांमध्ये देखील डगमगत नाही.
लाख उपाय कर ले प्यारे कदे न मिलसि यार ।
बेखुद हो जा देख तमाशा आपे खुद दिलदार ॥
हरिहर आदिक जगत में पूज्य देव जो कोय ।
सदगुरु की पूजा किये सबकी पूजा होय ।।
स्नातं तेन सर्वं तीर्थदातं तेन सर्व दानम् ।
कृतं तेन सर्व यज्ञं येन क्षणं मनः ब्रह्मविचारे स्थिरं कृतम् ।।
Significance
&
Importance
of
Guru Purnima
in Marathi
हरिहर आदिक जगत में पूज्य देव जो कोय ।
सदगुरु की पूजा किये सबकी पूजा होय ।।
स्नातं तेन सर्वं तीर्थदातं तेन सर्व दानम् ।
कृतं तेन सर्व यज्ञं येन क्षणं मनः ब्रह्मविचारे स्थिरं कृतम् ।।
Significance & Importance of Guru Purnima
2022 Guru Purnima Puja Vidhi in Marathi
या दिवशी सद्गुरूंची पूजा केल्याने वर्षभरातील पौर्णिमांच्या व्रत-उपवासाचे पुण्य होते.
साधकाने पौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवावे, सद्गुरूंचे मानसिक अर्ध्य-पाद्यादीने पूजन करावे, मग मनोमन टिळा लावाला, फुलांचा हार घालावा आणि त्यांच्याकडे एकटक पहावे. पाहता-पाहता त्यांच्या ज्ञानाचे स्मरण करावे.
अरे, कोणी पेलाभर पाणी पाजतो तर त्याला धन्यवाद द्यावा लागतो, नाहीतर गुणचोर (कृतघ्न) होण्याचा दोष लागतो. कोणी आपल्याला खाऊ घातले अथवा 4 पैशांची मदत केली तेव्हाही कृतघ्न बनू नये. कृतघ्न माणूस मोठा पापी मानला जातो. जेव्हा संसारी गोष्टीत कृतघ्न माणूस दोषी होतो तर सद्गुरूंनी तर इतके सर्व ज्ञान, भक्ती, करुणा- -कृपेचा खजिना दिला, इतके पुण्य आणि सुखद जीवन जगण्याची कला दिली… तर अशा सद्गुरूंच्या ऋणातून शिष्य-भक्त उऋण न होता कृतघ्नतेच्या दोषाने दबून जाईल आणि जन्म मरणाच्या चक्रात फसेल – असे होऊ नये आणि शिष्यांचे ज्ञान नष्ट होऊ नये, त्यांची भक्ती, साधना विखरून जाऊ नये यासाठी शिष्य सद्गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर विशेषरूपाने सद्गुरूंचे मानसिक पूजन करावे, स्मरण करावे आणि गुरुदेवांनी जे सांगितले आहे ते आपल्या जीवनात अंगीकारण्याचा संकल्प करावा.
मानस पूजनाची सम्पूर्ण विधि जानण्यासाठी व Audio & Video मध्ये Download करा :
विधिवत जपमाला पूजा मराठी
Jap Mala Pujan Vidhi
सद्गुरु-पूजन का ?
सद्गुरु मेरा सूरमा करे शब्द की चोट ।
मारे गोला प्रेम का हरे भरम की कोट ।
आपल्याला वास्तविक जीवनाचा आनंद व माधुर्य मिळवून देण्यासाठी जे आपल्या वृत्तींना सुव्यवस्थित करण्यात सक्षम आहेत असे सिद्धपुरुष – वेदव्यासांसारखे ब्रह्मज्ञानाचे दाता सद्गुरूंच्या पूजनाचा दिवस आहे गुरुपौर्णिमा !
शिक्षक, प्रोफेसर किंवा नृत्य-गायन वा कुस्ती शिकविणाऱ्या गुरूंहून सद्गुरू विलक्षण असतात. या आषाढी पौर्णिमेला गुरूंच्या पूजनाचा अर्थ जे आपल्याला मन-इंद्रियांच्या आकर्षणांपासून वाचवून भगवद्रसाकडे घेऊन जाण्यात सक्षम असतील, श्रोत्रिय असतील अर्थात् शास्त्रांचे ज्ञाता असतील व परमात्मरस अनुभव करीत असतील आणि दुसऱ्यांनाही त्याचा अनुभव करविण्याची रीत जाणत असतील तसेच ज्यांची सत्स्वरूप परमात्म्यात स्थिती असेल अशा सद्गुरूंची पूजा आहे.
गुरु पादुकांचे विधिवत व मानसिक पूजा कशी करावी ?
विधिवत माला पूजन की विधि विस्तार में पढ़े
FAQ’s
गुरु पौर्णिमा कधी आहे ?
13 जुलै 2022
गुरुपौर्णिमा ची तिथी आणि शुभ मुहूर्त ?
13 जुलै 2022
Story of Guru Purnima in Marathi
पूर्ण वाचा :- Click Here
When is Guru Purnima 2022?
बुधवार, 13 जुलै 2022
What is special about Guru Purnima ?
गुरूंचे महत्व [Importance of Guru in Marathi]
- जे गुरु आहेत तेच शिव आहेत, जे शिव आहेत तेच गुरु आहेत. जो ह्या दोघांमध्ये फरक मानतो तो गुरुपत्नीगमन करणाऱ्या मनुष्याएवढाच पापी आहे.
- गुरुदेवांची सेवा हीच तीर्थराज गया आहे. गुरुदेव यांचे शरीर अक्षय वटवृक्ष आहे. गुरुदेवांचे श्रीचरण म्हणजे भगवान विष्णूचे श्रीचरण आहेत. तिथे स्थित केलेले मन तदाकार होते. ज्ञान गुरुदेवाच्या श्रीमुखात असते आणि ते फक्त गुरुदेवांच्या भक्तीनेच प्राप्त होते. ही गोष्ट तिन्ही जगातील देवता, ऋषी, पितरे आणि मानवांनी स्पष्टपणे सांगितली आहे.
- ‘गु’ या शब्दाचा अर्थ अंधार (अज्ञान) आहे आणि ‘रु’ शब्दाचा अर्थ प्रकाश (ज्ञान) आहे. जो अज्ञानाचा नाश करतो तो ब्रह्मरूप प्रकाश गुरु आहे. याबद्दल कोणतीही शंका नाही. सद्गुरू अज्ञान काढून, जन्म आणि मृत्यूची बंधने तोडून आपल्याला स्वरूपामध्ये स्थापित करतात.
- आजपर्यंत जगाबद्दल जे काही तुम्हाला माहिती आहे ते आत्मा आणि परमात्माच्या ज्ञानासमोर एक पैशाचे देखील नाही. मृत्यूच्या एका झटक्यात ते सर्व अज्ञात होईल, परंतु सद्गुरू केवळ हृदयात लपलेले परमात्मा दर्शवतात. जेव्हा आपल्याला अशा सद्गुरूंची दीक्षा प्राप्त होते, तेव्हा आयुष्यातील निम्मी साधना अशाच प्रकारे पूर्ण होते.
- भगवान शिव म्हणतात की “गुरु हेच देव आहेत, गुरु हेच धर्म आहेत, गुरूशी निष्ठा ही सर्वोच्च तपस्या आहे”. गुरुशिवाय दुसरे काही नाही.”