Skip to content
Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi: Mahiti, Story

Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi: Mahiti, Story

Chatrapati Shivaji Maharaj Information, Mahiti in Marathi (For Essay, Speech, Nibandh)

  • सतराव्या शतकात हिंदुस्थानात मुघल शासकांद्वारे अत्याचार, लूटमार वगैरे. वाढतच होती. हिंदूंना बळजबरीने मुस्लीम बनविले जात होते. मुघलांबरोबरच पोर्तुगीज व इंग्रजांनीही भारतभूमीत आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. परिस्थितीपुढे गुडघे टेकत असलेला हिंदू समाज हळूहळू राजनैतिक व धार्मिक दुरावस्थेकडे अग्रेसर होत होता. सर्वांत भयंकर प्रहार आपल्या संस्कृतीवरच होत होता. धन व सत्तेच्या वासनेने बरबटलेले हे हैवान आपल्या आयाबहिणींची अब्रू खुलेआम लुटत होते. अशा विषम परिस्थितीत पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यात फाल्गुन कृष्ण तृतीयेला (इ.स. 1630) शिवरायांचा जन्म झाला.
  • बालपणापासूनच मातोश्री जिजाबाईंनी रामायण, महाभारत, उपनिषद व पुराणांमधील धैर्य, शौर्य, धर्म आणि आपल्या मातृभूमीप्रती प्रेमभावाच्या कथा – गाथा सांगून त्यांच्यात या सद्गुणांबरोबरच एक प्रचंड प्राणबळ फुंकले.. परिणामी वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्याचा विस्तार करण्याचा दृढ संकल्प केला आणि आपल्या सुखचैनीची, ऐश-आरामाची पर्वा न करता धर्म, संस्कृती व देशवासींचे रक्षण करण्यासाठी नाना जोखिमी पत्करून विधर्मी सत्तेला टक्कर देऊ लागले. त्यांनी प्रबळ पुरुषार्थ, दृढ मनोबळ, प्रचंड उत्साह आणि अद्भुत पराक्रम दाखवित भारतभूमीत पसरत असणाऱ्या मुघल शासकांची पायमुळे हलविण्यास सुरुवात केली. शत्रू त्यांना आपला काळ समजत होते. ते शिवरायांचा सफाया करण्यासाठी नित्यनवीन कट रचत होते. धूर्तता, सामर्थ्य, कपट वगैरे कोणत्याही प्रकारे कुमार्गाचे अनुसरण करण्यात त्यांनी कोणतीच कसर ठेवली नव्हती. परंतु शत्रूंना हे माहीत नव्हते की ज्याचा संकल्प दृढ व इष्ट मजबूत असते त्याचे अनिष्ट जगातील कोणतीच ताकद करू शकत नाही. शिवराय विवेकाच्या ठिकाणी विवेक, सामर्थ्याच्या ठिकाणी सामर्थ्य व या दोहोंच्या पलीकडील परिस्थितीत ईश्वर आणि गुरुनिष्ठेचा आश्रय घेत शत्रूंना सडेतोड उत्तर देत होते.
  • बालपणीच मातेने संतांप्रती श्रद्धेचे जे बीज वीर शिवरायांच्या मन-बुद्धीत पेरले होते, त्यानेच पुढे जाऊन विराट रूप धारण केले. या महान योद्धाच्या मुखमंडलावर शौर्य व गांभीर्य झळकत होते आणि हृदय ईश्वर व संतांप्रती निष्ठेने परिपूर्ण होते. वेळोवेळी ते संत महापुरुषांच्या शरणी जात आणि त्यांच्याकडून ज्ञानोपदेश प्राप्त करीत, जीवनाचे सार काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न करीत.
  • एकदा ते संत तुकाराम महाराजांच्या दर्शन-सत्संगासाठी व त्यांचा आर्शीवाद घेण्यासाठी देहू गावी गेले. ते या ईश्वरनिष्ठ महापुरुषाला पाहून इतके प्रभावित झाले की त्यांच्याकडे अनुग्रहाची याचना करू लागले. परंतु दूरदर्शी संत श्री तुकाराम महाराजांनी त्यांना विविध कलांनी संपन्न लोकसंत समर्थ रामदासांना शरण जाण्याचा सल्ला दिला. संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगात या प्रसंगाचा उल्लेखही येतो.

राजा छत्रपती । ऐकावें वचन ।
रामदासीं मन । लावीं वेगें ॥1॥
रामदास स्वामी । सोयरा सज्जन ।
त्यासी तन मन । अर्पी बापा ॥2॥
मारूती अवतार । स्वामी प्रगटला ।
उपदेश देईल । तुजलागी ॥3॥

  • ‘राजे छत्रपती ! माझे ऐका आणि लगेच समर्थ रामदासांच्या भक्तीत आपले मन लावा. ते शरणागत भक्तांना आश्रय देणारे सज्जन संत आहेत. म्हणून आपले तन-मन-धन अर्थात सर्वस्व त्यांना अर्पण करा.. रामदास स्वामी साक्षात हनुमंतांचे अवतार आहेत. ते तुम्हाला उपदेश देतील, यात कसलीही शंका नाही.’
  • धर्मनिष्ठ शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींच्या श्रीचरणी गेले आणि त्यांच्याकडे अनुग्रहाची याचना केली. समर्थांनी त्यांना विधिवत् मंत्रदीक्षा दिली आणि म्हटले : “या जगी आलेला प्रत्येक जण सच्चिदानंदस्वरूप परमात्मा आहे. म्हणून तुम्हीसुद्धा तोच परमात्मा आहात ! माणसा-माणसात भेदभाव न करता तुम्ही राजधर्माचे पालन केले पाहिजे.”
  • गुरूंचा उपदेश शिरोधार्य करून शिवाजी महाराज ‘मंत्रमूलं गुरोर्वाक्यं’ वर अंतिम क्षणापर्यंत दृढ राहिले. एकदा शिवाजी महाराजांनी आपल्या गुरुदेवांकडून राज्यासाठी शुभ चिन्ह मागितले. तेव्हा समर्थांनी अंगावर ओढलेले भगवे वस्त्र त्यांना दिले. महाबुद्धिमान वीर शिवाजी महाराजांनी त्या वस्त्राला आपल्या स्वराज्याचे निशाण बनविले. तो भगवा ध्वज शेवटपर्यंत मराठा साम्राज्याची निशाणी बनून राहिला.
  • शिवाजी महाराजांचे बरेचसे जवळचे व दूरचे नातेवाईक मुस्लीम शासकांच्या सैन्यात होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत समर्थ रामदासांनी लोकांमध्ये शिवरायांप्रती विश्वास जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. परिणामी हळूहळू मराठा युवक वीर शिवाजींच्या सैन्यात सामिल होऊ लागले. आपल्या सुख-चैनीची पर्वा न करता कर्मयोगी शिवाजी महाराज अविश्रांतपणे राज्यक्रांतीत संलग्न राहिले. हारलेल्या कित्येक हिंदू राज्यांना पुन्हा जिंकून त्यांनी एकछत्र राज्याची स्थापना केली. असे संघर्षमय जीवन व्यतीत करीत असतानाही त्यांनी आपले सद्गुरू समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज व इतर महापुरुषांच्या सेवेत कोणतीच कसर ठेवली नाही !
  • ते शत्रूंसाठी तर अति भयंकर शूरवीर होते, परंतु आपल्या प्रजेसाठी प्रेमावतार होते. त्यांची आपल्या प्रजेप्रती हिताची भावना पाहून गदगद होऊन कधी कधी समर्थ त्यांना ‘प्रजाहितदक्ष’ म्हणून संबोधत असत. या प्रजाहितदक्ष सम्राटाने बिचाऱ्या भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांच्या हिताकडे खूप लक्ष दिले. युद्धासाठी निघणाऱ्या सैनिकांना ते विशेष सूचना द्यायचे : “मार्गात येणाऱ्या रयतेला कोणत्याही प्रकारचे कष्ट देता कामा नये. शेतातील पिकाच्या एका पानालाही तुमच्यापैकी कोणी स्पर्श करता कामा नये.”
  • त्यांच्याद्वारे परहिताची अगणित कार्ये अविरत होतच राहिली. त्यांच्या राज्यव्यवस्थेत आयाबहिणींची अब्रू, प्रतिष्ठा सुरक्षित राहील याकडे विशेष लक्ष पुरविले जायचे. मनमुख तरुणांना ते कठोर शिक्षा देण्यास चुकत नसत. फारशी भाषेच्या प्रभावामुळे लुप्त होत चाललेला संस्कृत भाषेचा गौरव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी संस्कृतचे प्रचलन सुरू केले. जबरदस्तीने मुसलमान बनविल्या गेलेल्या हिंदूंचे शुद्धिकरण करून त्यांना पुन्हा हिंदू समाजात परत घेतले. आपल्या सद्गुरूंची व महापुरुषांची सेवा करीत ते धर्मरक्षण व प्रजेच्या कल्याणाच्या पवित्र कार्यात आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत संलग्न राहिले. आज जवळजवळ साडेतीनशे वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज केवळ राज्यकर्त्यांसाठीच नव्हे तर विश्वभरातील लोकांसाठी एक अति उज्ज्वल प्रेरणास्रोत बनले आहेत.
  • – ऋषी प्रसाद, मार्च 2007

इतरांना शेयर करा...

थोडक्यात - हेही वाचा

नियमित महत्वाची माहिती हवी आहे ?

Must Read

सर्वाधिक वाचलेले

आमच्याशी जुडा

पोस्ट आपल्या व्हाट्सप्प वर मागविण्यासाठी आम्हाला आपलं नाव, गांव/शहर व जिल्हा मैसेज करा